नवी दिल्ली – फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडियाने भारतात बाटलीबंद पाणी पुरवणाऱ्या कंपन्यांना पाण्यातील कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी करण्यास सांगितले आहे.
त्यासाठीची मुदत 1 जानेवारी 2021 होती. मात्र कंपन्यांचे काम अजूनही पूर्ण झाले नसल्यामुळे हे खनिजाचे प्रमाण कमी करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुळात अन्नसुरक्षा नियंत्रकांनी या कंपन्यांना 1 जुलै 2020 अगोदर बाटलीबंद पाण्यातील खनिजाचे प्रमाण कमी करण्यास सांगितले होते. मात्र त्यावेळी लॉकडाऊन आल्यामुळे ही मुदत 1 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती.
आता त्यामध्ये आणखी सहा महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. करोनाचा परिणाम अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही. यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी या कंपन्यांनी अनतन सुरक्षा नियंत्रकाकडे केली होती. त्याचा विचार करून ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
अन्न सुरक्षा नियंत्रकांच्या वेबसाईटवर पाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम चे प्रमाण किती असावे याचा आराखडा देण्यात आलेला आहे.