Sanjay Nirupam| संजय निरुपम यांची बुधवारी 3 एप्रिल रोजी काँग्रेसने पक्षातून हकालपट्टी केली. निरुपम यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी होत असल्याचं के सी वेणुगोपाल यांनी आपल्या पत्रातून सांगितलं आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे निरुपम यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
वास्तविक, मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याने संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त करत होते. इतकेच काय तर मुंबईतील सगळ्या जागांवर ठाकरे गटाचा पराभव होईल, असे भाकीतही त्यांनी वर्तविले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे यांची ताकदच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे मुंबईतील चार ते पाच जागा ठाकरे गटाला देणे, ही काँग्रेसची घोडचूक असल्याचे वक्तव्यं संजय निरुपम यांनी केले.
दरम्यान, संजय निरुपम हे मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. परंतु जागावाटपानंतर ही जागा ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याकडं गेली. त्यामुळं संजय निरुपम नाराज होते. यानंतर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेनेतील जागा वाटपाबाबतचे वाद समोर येण्यास सुरुवात झाली. निरुपम यांच्या भूमिकेमुळे पक्षाने स्टार प्रचारकांच्या यादीतून त्यांचं नावही कमी केलं होतं. Sanjay Nirupam|
संजय निरुपम यांचे ट्वीट Sanjay Nirupam|
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी दुपारीच संजय निरुपम यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे संकेत दिले होते. पटोले यांच्या घोषणेनंतर लगेचच संजय निरुपम यांनी X वर पोस्ट करत “काँग्रेस पक्षानं माझ्यासाठी जास्त ऊर्जा वाया घालवू नये. त्याऐवजी पक्षाला वाचवण्यासाठी त्याचा वापर करावा. पक्ष गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मी दिलेला एक आठवड्याचा कालावधी आज पूर्ण झाला आहे. उद्या मी निर्णय घेईन,” असं त्यांनी त्यात म्हटलं होतं.
निरुपम यांची राजकीय कारकीर्द – Sanjay Nirupam|
निरुपम हे काही काळ शिवसेनेत होते. 2005 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली. त्यांनी उत्तर भारतीय फेरीवाल्यांचा मुद्दा उपस्थित केला आणि नंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2009 च्या निवडणुकीत ते उत्तर मुंबईतून विजयी झाले.
हेही वाचा:
मोठी बातमी ! अमरावती लोकसभा मतदारसंघातून आनंदराज आंबेडकरांची माघार ; वंचितला देणार पाठिंबा