BMC Khichdi Scam| संजय निरुपम यांनी खिचडी घोटाळ्याचे संजय राऊत हे मुख्य सूत्रधार असल्याचे म्हणत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, अमोल कीर्तिकर यांना ईडीने समन्स बजावले आहेत.
नेमकं काय म्हणाले संजय निरुपम ? BMC Khichdi Scam|
“संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पकडले गेल्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावे लाच घेतल्याचं समोर आले होते. त्यांनी पत्नीला मधे आणायला नको होतं. खिचडी घोटाळ्यात त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत,” असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
“सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीत राजीव साळुखे, सुजीत पाटकर हे संजय राऊतांचे पार्टनर आहेत. कोविडमध्ये त्या कंपनीला 6 कोटी 37 लाखांची खिचडी पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. या कंपनीतून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंब, मित्रांनी 1 कोटी रुपये दलाली म्हणून घेतले. बँकेतील खात्यातून मुलीच्या नावे संजय राऊतांनी चेकने लाच घेतली. या कंपनीकडून संजय राऊत यांनी कुटुंबातील सदस्यांमार्फत १ कोटी रुपयांची दलाली घेतली”,” असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे.
संजय राऊतही खिचडी चोर BMC Khichdi Scam|
“35 रुपयात 300 ग्रॅम खिचडी पुरवठा करण्याचं कंत्राट सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीला मिळालं होतं. कोविडमध्ये हतबल लोकांना खिचडी पुरवण्याचा कंत्राट पालिकेने कंपनीला दिलं होता. पण नंतर 16 रुपयात 100 ग्रॅम खिचडी देण्याचं कंत्राट दिलं जातं. म्हणजे 200 ग्रॅम खिचडी चोरण्यात आली. म्हणूनच फक्त अमोल कीर्तिकर नाही, तर संजय राऊतही खिचडी चोर आहेत. त्यांनी पैसे खाल्ले आहेत, ” असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हा सगळा घोटाळा झाला आहे. लोकांचा जीव जात असताना उद्धव ठाकरे गटाचे लोक गरिबांच्या हक्काच्या खिचडीत घोटाळा करत होते. ईडीने चौकशी वाढवावी आणि संजय राऊतांना अटक करावी,” अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. दरम्यान, निरुपम काँग्रेस पक्षात असानाही त्यांनी मविआ उमेदवार अमोल कीर्तीकर यांना विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता निरुपम यांनी पत्रकार परिषदेद्वारे त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
हेही वाचा:
“माझं वय काढू नका…हा गडी थांबणारा नाही…”; शरद पवारांचा विरोधकांना इशारा