भोपाळ – मध्य प्रदेशातील मोहन यादव सरकारमध्ये २८ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सरकार स्थापन झाल्यावर तब्बल २२ दिवसांनी मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. १८ जणांना कॅबिनेट मंत्री म्हणून, ६ जणांना राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार म्हणून तर ४ जणांना राज्यमंत्री म्हणून पदाची शपथ देण्यात आली. कैलाश विजयवर्गीय, प्रल्हाद पटेल आणि तुलसी सीलावट आदी दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय आणि खुल्या वर्गातील अशा सगळ्या वर्गांना मंत्रिमंडळात सामावून घेत संतुलन साधण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. ओबीसींमधील प्रल्हाद पटेल, कृष्ण गौर, इंदर परमार, नरेंद्र शिवाजी पटेल, लखन पटेल, एंदल सिंह कंसाना, नारायण सिंह कुशवाहा, धमेंद्र लोधी, नारायण पवार, राव उदय प्रताप, धर्मेद्र लोधी यांना मंत्रिमंडळात सामावून घेण्यात आले आहे.
तर राधा सिंह, सम्पतीया उइके, विजय शाह, निर्मला भूरिया हे अनुसूचित जमातीतील प्रतिनिधी असतील. अनुसूचित जातींमधील तुलसी सीलावट, प्रतिमा बागरी, गौतम टेंटवाल, दिलीप अहिरवार यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.