चिंबळी – जनतेतून थेट नगराध्यक्ष आणि सरपंच नेमण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीला मारक आहे. पंतप्रधानाला अख्खा देश, मुख्यमंत्र्यांना अख्ख्या राज्यातून मतदान होते का, मग हे सरपंचांच्याच का मुळावर? केवळ राष्ट्रवादीचे जास्त सरपंच आणि नगराध्यक्ष होतात म्हणून लादण्यात आलेला हा निर्णय आहे. आता काय तर बाजार समित्यांना सगळ्या शेतकऱ्यांनी मतदान करायचे, बाजार समित्या सक्षम आहेत का, यावर विधीमंडळात आवाज उठवू, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले.
चाकण (ता. खेड) येथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार दिलीप मोहिते व जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप गारटकर होते.
अजितदादा पवार म्हणाले, करोना काळात सर्व धंदे ठप्प झाले होते. परप्रातीयांना गावाकडे जाण्याची सोय, रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा, रेमिडीसवीर साठी उद्धव ठाकरे, मी, राजेश टोपे व सर्व सहकाऱ्यांनी अतोनात प्रयत्न केले. विकास कामांसाठी आमदारांचे निधी वाढविले. आपल्या जिल्ह्याला डीपीडीसीला 400 कोटींचा निधी दिला. पालखी मार्गांचे काम केले. पुणे-ना सिक महामार्गावर भूसंपादन करून काम मार्गी लावले. प्रसंगी कठोर भूमिका घेतली.
भामा आसखेडचे पाणी पुण्याकडे नेताना आळंदीला पाणी देण्यास प्राधान्य दिले. चाकण पाणीपुरवठा साठी प्रयत्न करणार आहे. पाणी प्रश्न, अ तिवृष्टी, पंचनामे असे प्रश्न सोडवायचे आहेत. आधी 50 हजार रुपये वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान द्या, मुख्यमंत्र्यांना याबाबत मी सभागृहात पुन्हा सांगणार आहे.
खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अजित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खेड तालुक्यातील 55 दिव्यांगांना अजित पवार यांच्या हस्ते इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल वाटप करण्यात आले.
संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे व त्यांचे सर्व सहकारी यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आला. तसेच 42 कार्यकर्त्यांना विविध पद नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार राम कांडगे, एस. पी. देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, सुरेखा पानसरे, सुनील चांदेरे, नंदा गोपाळे, डी. डी. भोसले, विलास कुऱ्हाडे, वासुदेव घुंडरे, अरुण चौधरी, विनायक घुमटकर, राजाराम लोखंडे, रामदास ठाकूर, सुरेश शिंदे, अनिल लोखंडे, धैर्यशील पानसरे, विलास कातोरे, चंद्रकांत इंगवले, जयसिंग दरेकर, भारती शेवाळे, आशा तांबे, संध्या जाधव, शांताराम सोनवणे, अनिलबाबा राक्षे, संभाजी खराबी, लक्ष्मण टोपे, मयूर मो हिते, दिनेश मोहिते, जीवन सोनवणे, चाकण शहर अध्यक्ष राम गोरे, मोबीन काझी आदी सह विविध गावचे सरपंच, उपसरपंच, चेअरमन, कार्यकर्ते उपास्थित होते.
तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी प्रास्ताविक केले. पूजा थिगळे यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल नायकवाडी यांनी आभार मानले.
… त्यांनी सगळ्यांना तिलांजली दिली
आठ – दहा दिवसापासून दोन मंत्र्यांचे सरकार चालू आहे. भाजप सत्तेच्या व पैशाच्या जोरावर काय करू शकते हे उत्तम उदाहरण आपण पाहिले. त्यांनी कायदे, न्यायव्यवस्था सगळ्यांना तिलांजली दिली. राज्यपालांनी वर्षभरात बारा पैकी एकही आमदार नियुक्त केले नाही. राज्यपाल, केंद्र सरकार यांनी महाआघाडी सरक ार फोडले. सभागृहाबाहेर जरी एखादा सदस्य पक्षाच्या विरोधात गेला तरी तो अपात्र ठरतो. निरव मोदीने लंडनच्या कोर्टात भाजपच्या भ्रष्टाचाराचे कथन केले, असे आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले.