पणजी – कॉंग्रेसने गोव्यातील आपल्या 11 पैकी 5 आमदारांना तामिळनाडूची राजधानी चेन्नईला हलवले. राष्ट्रपती निवडणुकीतील मतदानासाठी ते सोमवारी पणजीत परततील.
कॉंग्रेसचे काही आमदार फुटून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आले. मात्र, कॉंग्रेसमधील ते संभाव्य बंड फसल्याचेही नंतर समोर आले. आता राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने अचानकपणे काही आमदारांना इतर राज्यात हलवले. त्यामुळे पक्षात सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकेल लोबो यांच्यासह कॉंग्रेसचे 6 आमदार गोव्यातच आहेत. बंडाची कुणकुण लागल्यानंतर कॉंग्रेसने याआधीच कारवाईचे पाऊल उचलले. त्यानुसार, लोबो यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हटवण्यात आले. तसेच, लोबो आणि कामत यांच्या विरोधात अपात्रतेची याचिकाही विधानसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आली.
‘…त्याला रेवडी वाटणे म्हणतात’ केजरीवालांचे मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर
गोव्यातील घडामोडी पाहता राष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेसचे काही आमदार क्रॉस-व्होटिंग करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे त्या पक्षाकडून सावधगिरी बाळगली जात असल्याचे दिसते.
‘दोन मंत्र्यांच्या…’ म्हणत संजय राऊतांचे शिंदे सरकारच्या घटनात्मक वैध्यतेवरच बोट