Eknath Khadase on Eknath Shinde – अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा केला. या दौऱ्यावेळी अनेक शिंदे समर्थक आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या दौऱ्याला अनुपस्थित असणाऱ्यांची संख्या देखील मोठी असून त्यांची ही अनुपस्थिती विरोधकांच्या डोळ्यातून सुटलेली नाही. शिंदेंच्या दौऱ्यावेळी अनुपस्थित असलेले आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी, शिंदेंच्या दौऱ्याला आमदारांनी दांडी मारण्यावरून मोठं राजकीय भाकीत केलं आहे.
काय म्हणाले एकनाथ खडसे?
जहाजातून जसे उंदीर पळतात, त्याप्रमाणे सर्व आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील, असं भाकीत एकनाथ खडसे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे सांगताना, “मुख्यमंत्र्यांबरोबर अयोध्येला अनेक आमदार गेले नाहीत. आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. अपक्ष आमदारांमध्येही अस्वस्थता आहे.” असा दावा केला.
‘शेतकऱ्यांना हेक्टरी…’ अजित पवारांची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी मागणी…
बच्चू कडू यांच्या विधानाचा दाखला…
यावेळी खडसे यांनी अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विधानाचा दाखल देत सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, “मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होत नाहीये. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचं नेहमी गाजर दाखवलं जातंय. त्यामुळे बच्चू कडूंसारखे आमदार अनेकदा विधानं करत आहेत. आता मंत्रिमडळाचा विस्तार २०२४ नंतरच होणार आहे. म्हणजेच २०२४ च्या निवडणुका झाल्यानंतरच मंत्रीमडळ तयार होईल, अशी उपरोधिक टीका बच्चू कडू यांनी केली आहे.”
अनेक आमदार खासगीमध्ये बोलताना… | Eknath Khadase on Eknath Shinde
“अनेक आमदार खासगीमध्ये बोलताना सरकारबाबत नाराजीची भावना व्यक्त करत आहेत. त्यामुळे जेव्हा निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील आणि कोर्टाचा निकाल लागेल. तेव्हा जहाजातून उंदीर जसे पळतात, त्याप्रमाणे हे सगळे आमदार हळुहळू शिंदे सरकारला सोडून जातील.” असा दावाही खडसे यांनी केला आहे.
अजित पवार भाजपसोबत जाणार? प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं कोड्यात उत्तर…