अकलूज – दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणाऱ्या खंडाळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या दत्तनगर गावच्या विहिरीजवळ एक विंधन विहीर व विहिरीमध्ये आडवे बोअरवेल करुन देण्याची मागणी माळशिरस तालुका भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी माळशिरस तालुका भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस विनोद थिटे यांच्या नेतृत्वाखाली खंडाळी गावचे सरपंच बाबुराव पताळे यांना निवेदन देण्यात आले.
मागील तीन वर्षांपासून दत्तनगर पाणीपुरवठा योजनेला ऐन मेमहिन्यात पाणीटंचाई भेडसावत आहे. दत्तनगर पाणीपुरवठा फक्त विहीरीवर अवलंबून आहे. त्यासाठीग्रामनिधी योजनेतून दत्तनगर पाणीपुरवठ्यासाठी एक अतिरिक्त बोअरवेल व विहिरीत आडवे बोअरवेलपाडून मिळावे. त्यामुळे दत्तनगरचा पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकेल, असे निवेदनात म्हटले आहे. आपल्या मागण्यांचा निश्चितपणे विचार करुन दत्तनगर परिसरातील पाणीप्रश्न येत्या 10 दिवसांत मार्गी लावू असे सरपंच बाबुराव पताळे यांनी आश्वासन दिले.यावेळी युवा मोर्चाचे सरचिटणीस विनोद थिटे, प्रशांत गायकवाड, जीवन पवार, देवा पवार, कमाल शेख, आबा पवार, प्रदीप ढाणे, भैय्या जगताप, दीपक वाघमारे, मनोज सोनवणे, शिवाजी खुळे, अल्ताफ शेख उपस्थित होते.