मागील दिड ते दोन महिन्यातील विजेच्या ताराने ऊस जळण्याची हि चौथी घटना आहे.
हिंगोली (शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गिरगांव येथे विज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुन्हा एकदा शेतक-याच्या चार एकर ऊसाची राख रांगोळी झाली. गिरगांव येथील शेतकरी भुंजग गगांराम क-हाळे कल्पना न-होबा क-हाळे यांच्या गिरगाव शिवारातील विजेचा तार तुटून चार ते पाच एकर ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा आता तरी झोपेच सोंग घेतलेल्या महावितरण विभागाने या कडे लक्ष द्यावे अशी मागणी गिरगांव येथील शेतक-याकडून होत आहे. तसेच त्वरित वीजवितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भुजंग क-हाळे या शेतक-यानी केली आहे.
वडगाव फिटर वर भुजंग क-हाळे यांच्या शेतातुन विजेचे तार लटकलेले आहेत. ते तार उंचावुन घेण्याची अनेक वेळा मागणी सदरिल शेतक-यानी विज वितरण कंपणीकडे केली होती. पण या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी दुपारी लटकलेले विजेचा तार तुटुन सदरिल शेतक-याच्या तोडणीस आलेल्या ऊसाच्या फडात पडला. आणि बघता बघता ऊसाने पेट घेऊन चार एकर ऊस जळुन खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे शेतक-याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.
अगोदरच शेतकरी अस्मानी संकटाच्या सामन्यातुन सावरत नाही, तोच विज वितरण कंपनीच्या नाकर्तेपणाचा बळी ठरला. वीजवितरण कंपनीच्या गलथान कारभारा विषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या दिड ते दोन महिन्यामधील हि चौथी घटना असुन याकडे वीजवितरण कंपणीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.