कोल्हापूर – परमबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्याचे आश्वासन मिळाले असावे त्यामुळे ते पत्रांचा आटापिटा करत असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यानी केला आहे. कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहावर आज हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखे असे काय झाले, असा सवालही त्यांनी केला. एवढ्या प्रकरणावरून जर राष्ट्रपती राजवट लागत असेल तर गोध्रा हत्याकांडाच्या वेळी कॉंग्रेसलाही राष्ट्रपती राजवट लावता आली असती, असा पलटवार त्यांनी केला. तसेच राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी घटनेत तरतूद आहे. त्या तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लागू करण्यासारखे काही घडलेच नाही. भाजपकडे बहुमत नसल्याने राष्ट्रपती राजवटीचा विषयच येत नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.