पाटणा/मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाच्या बिहार पोलिसांच्या तपासावर देखरेख करण्यासाठी आलेल्या पाटण्याच्या पोलिस अधिक्षकांना मुंबई महापालिकेने 15 ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन सेंटर मध्ये पाठवले. दरम्यान या तपासात बिहार पोलिसांचे कोणतेही काम नसल्याचा सल्ला राज्याच्या विधी विभागाने सरकारला दिला ाहे. सरकारने याबाबत अभिप्राय मागवला होता. तर ईडीने सुशांतच्या सीएची याप्रकरणात चौकशी केली आहे.
अधिक्षक विनय तिवारी यांचे रविवारी मुंबईत आगमन झाले त्यांना रात्री गोरेगाव येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात आले. त्यांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्काही मारण्यात आला आहे. निहारचे पोलिस महासंचालक गुप्तेश्वरत पांडे यांनी तिवारी यांना जबरदस्तीने विलगीकरण कक्षात पाठवण्यात आल्याचा आरोप केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत मुंबई महापालिकेनेही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तिवारी यांचे क्वॉरन्टाईन नियमानुसारच असून देशांतर्गत विमान प्रवास केल्याने पाटणा एसपी यांना क्वॉरन्टाईन केल्याचे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिले. अलगीकरणातून सूट देण्यासाठी मुंबई महापालिका तयार आहे. मात्र त्यासाठी नियमानुसार अर्ज करणे गरजेचे असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले.
ईडीकडून चौकशी
अंमलबजावणी संचनालयाकडून सुशांतचे चार्टर्ड अकौंटंट संदीप श्रीधर यांची चौकशी केली. श्रीधर हेच सुशांतच्या आर्थिक बाजू सांभाळत होते. गेल्या वर्षभरातील आर्थिक व्यवहारांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. या प्रकरणी बिहार पोलिसांनी ईडीकडे चौकशीची मागणी केली होती. त्यांच्याकडे अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तिच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती.
मुंबई पोलिसांनी अपल्या मुलाच्या जीवीताला धोका असल्याची तक्रार आपण 25 फेब्रुवारीला वांद्रे पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच आपल्या मुलाचा 14 जून मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर 40 दिवसांत कोणतीही कारवाई केली नाही, त्यामुळे मी पाटण्यात एफआयआर नोंदवला, असे सुशांतचे वडीलांनी सोमवारी सांगितले. मात्र, अशी कोणतीही तक्रार दाखल झाल्याचे माहित नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
समांतर तपास करता येतो? मुंबई पोलिस तपास करत असलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास बिहार पोलिसांना करता येतो का? याबाबत महाराष्ट्र सरकारने कायदेशीर मत मागावले आहे. या प्रकरणात बिहार पोलिस त्यांच्या न्यायिक क्षेत्राबाहेर जाऊन तपास करत आहेत. मुंबई पोलिसांचा तपास सुरू असताना हा हस्तक्षेप करण्यात आला आहे, याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले आहे.
टाईम्स मिररने दिलेल्या वृत्तानुसार, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 12 आणि 13 नुसार एखअद्या गुन्ह्याचा तपास सुरू असेल तर तो ज्या न्यायलयीन हद्दीत घडला त्या हद्दीतील पोलिसांकडून त्याचा तपास व्हायला हवा. निहार पोलिसांचे त्यात काही काम नाही, असे विधी विभागाने कळवले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.