मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार रेजिमेंटबाबत केलेल्या एका वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गलवान खोऱ्यात चीन व भारतीय जवानांमध्ये झालेल्या रक्तरंजित झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर गरीब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार रेजिमेंटचा उल्लेख करत, ‘बिहारमधील नागरिकांनी त्यांच्या पराक्रमाचा अभिमान बाळगावा’ असं वक्तव्य केलं होत.
दरम्यान, पंतप्रधानांच्या याच वक्तव्यावर टीका करत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं असून, “मराठा रेजिमेंटमधील सर्व जवान मराठा नाहीत. गोरखा रायफल्समधील सर्व जवान गोरखा नाहीत. मद्रास रेजिमेंटमधील सर्व जवान तामिळ नाहीत. त्याचप्रमाणे बिहार रेजिमेंटमधील सर्व जवान फक्त बिहारमधील नाहीत. लष्करात जात, धर्म आणि प्रादेशिकवाद घुसवू नका. मोदीजी सर्व जवान हे भारतीय आहेत” असा खोचक संदेश दिला आहे.
All soldiers in #MarathaRegiment are not #Marathas
Soldiers in #GorkhaRifles are not #Gorkhas
Soldiers in #MadrasRegiment are not #Tamil
–#BiharRegiment does not have only #Bihari soldiers
Don’t inject Caste,Relgion and regionalism in military ..#Modi all soldiers r #Indians— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 21, 2020
तत्पूर्वी, लडाख येथील गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या रक्तरंजित झटापटीत भारताच्या २० जवानांना हौतात्म्य आले होते. भारत-चीन दरम्यान सीमेवर झालेली ही नजीकच्या काळातील सर्वात मोठी रक्तरंजित घटना आहे. या घटनेनंतर भारतीय नागरिकांमध्ये चीनविरोधात असंतोषाचे वातावरण आहे.