मुंबई – बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांच्या विजेतेपदाच्या तसेच मानधनाच्या रकमेतही भरघोस वाढ केली आहे. आता देशातील सर्वात मानाच्या समजल्या जात असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल 5 कोटी रुपये मिळणार आहेत. तर महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या संघाल 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही घोषणा केली.
रणजी करंडक विजेत्या संघाला यापूर्वी 3 कोटी रुपये मिळत होते त्यात 2 कोटींची वाढ करण्यात आली आहे. तर महिलांच्या राष्ट्रीय स्पर्धेच्या विजेत्या संघाला यापूर्वी 6 लाख रुपये देण्यात येत होते, त्यात वाढ करुन 50 लाख रुपये मिळणार आहेत.