मुंबई : कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सातत्याने वाढत आहे. सध्या राज्यात 9 हजार 927 नव्या कोरोना करोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासोबतच संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कोरोनासंदर्भातील नियमांची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी लागू करण्याचे निर्देश प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासनाने घेतले आहे. राज्यातील मराठवाडा , विर्भात रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा लॉक डाउन करण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉक डाउन होणार का ? तसेच भारतात आता उन्हाळा सुरू होत असल्याने करोनाचा प्रसार कमी होईल असा अंदाज सर्रास व्यक्त केला जात आहे. असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे. याच प्रश्नांवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमाध्यमांशी बोलतांना आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान राजेश टोपे म्हणाले,’ कोरोनाचा साथ वाढण्याचा वातावरणाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोरोना वाढणार नाही. कोरोनाची साथ पुन्हा नियंत्रणात आणायची असेल तर त्यावर स्वयंशिस्त हा एकच उपाय आहेअसे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले, नागरिकांना कोरोनासंबधी नियम पाळण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेले ‘मी जबाबदार’ या सूत्राचे पालन केले पाहिजे. ते पाळण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर बंधनकारक आहे. ‘