पुणे – माहेरहून पैसे आणण्यासाठी पतीसह सासरच्या नातेवाईकांनी विवाहित महिलेस मारहाण करून मानसिक आणि शारीरिक छळ केला. यानंतर पतीने फोनवरच तलाक दिला. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल झाला.
कागदीपुरा, कसबा पेठ येथे राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार तिचा पती, सासू, चुलत सासू आणि नणंद या चौघांविरोधात मुस्लिम महिला संरक्षण कायद्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
फिर्यादी महिलेचा ऑगस्ट 2016 मध्ये विवाह झाला आहे. त्या मुंबईतील धारावी येथील शहीद गोपीनाथ नगरमध्ये पतीसह राहत आहे. मागील अनेक वर्षांपासून फिर्यादी महिलेचा “पती, सासू, चुलत सासू आणि नणंद हे तिला “आई-वडिलांकडून पैसे आण’ असा तगादा लावून मानसिक शारीरिक छळ करत होते. तसेच, तिला आरोपींनी मारहाणही केली. तसेच फिर्यादीच्या पतीने त्याना मोबाइलवर कॉल करून तलाक तीनवेळा बोलून विवाह संपुष्टात आणले.’