पुणे – माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतनिमित्त डॉ. रोहीत टिळक मित्र परिवाराकडून कराड तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या येणके, पोतले आणि आणे या गावात ३०० कुटुंबांना गृहोपयोगी वस्तूंचे संच तयार करून पाठवण्यात आले. वस्तू संचामध्ये (४ ताट,४ वाट्या,४ चमचे, ४ ग्लास, १ तांब्या, १ फुलपात्र, लोखंडी तवा आणि कढई)चा समावेश आहे.
हा कार्यक्रम काँग्रेस भवन येथे पार पडला. कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे अध्यक्ष नाना पटोले, पुणे शहर जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष रमेश बागवे, मोहन जोशी, अभय छाजेड, प्रवीण करपे व अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.