वाल्हे – येथील महर्षि वाल्मिकी विद्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सासवड यांच्या वतीने नुकतेच निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी मला काय व्हायचं, तर नववीतील विद्यार्थ्यांसाठी गणोशोत्सव-समाज प्रबोधन हा विषय देण्यात आला होता, अशी माहिती प्राचार्य अंकुश साळुंखे यांनी दिली.
स्पर्धेतील विजेते-गौरी प्रशांत भुजबळ (प्रथम), अंकिता दत्तात्रय भुजबळ (द्वितीय), करण संजय चव्हाण (तृतीय), निर्जरा नितीनकुमार पवार (प्रथम), साक्षी राजेंद्र नवले (द्वितीय), समृद्धी राजेंद्र भुजबळ (तृतीय).सिद्राम यशवंत भुजबळ, पांडुरंग शिरवळकर, मोहन साळवी, सुरेश कोडीतकर, सिद्राम भुजबळ, बाबासाहेब कुंभार, आम्रपाली गडवे, राजेंद्र डोंगरे आदी यावेळी उपस्थित होते. पी. बी. जगताप यांनी सूत्रसंचालन केले. एस. एम. भामे यांनी आभार मानले.