नारायणगाव -मुंबईकर हे आपलेच आहेत. पण सध्या करोना महासंकटामुळे मुंबईकरांनी तालुक्यात आल्यावर स्वतःची व समाजाची काळजी घ्यावी, अशी भावना नागरिकांमधून होत आहे. (दि. 31) जुन्नर तालुक्यामध्ये बाधितांची संख्या 22 वरून घटून 18 वर आली आहे. यामध्ये करोनाचा पहिला बळी (दि. 29) औरंगपूर येथील एका ज्येष्ठ नागरिकाचा गेला आहे. मुंबईतीळ घाटकोपर व भांडुप परिसरातून आलेल्या नागरिकांमुळे बाधा झाल्याचे दिसत आहे.
जुन्नर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. ही संख्या दोन दिवसांपासून घटत आहे. रुग्णसंख्या घटत असली तरी करोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अद्यापही चिंतेचे वातावरण आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून श्रीक्षेत्र लेण्याद्री येथे करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले आहे. बाधीतांवर उपचार करण्यात येत आहेत.
लेण्याद्री केंद्रात 9 रुग्ण उपचार घेत आहेत. नारायणगाव येथील दोनजणांचे स्वॅब घेतले आहेत. (दि.1) पुणे येथे पाठविण्यात येणार आहेत. मुंबई, पुणे व विविध शहरातून आलेल्या 13 हजार 317 नागरिकांना होम क्वारंटाइन व 772 जणांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती तहसीलदार हनमंत कोळेकर
यांनी दिली.
पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या
डिंगोरे – 1 (बरा झाला आहे), औंरगपूर – 1 (मृत्यु), सावरगांव – 5, धोलवड – 1, पारुंडे -3, मांजरवाडी -2, आंबेगव्हाण – 2, खिलारवाडी – 1, धालेवाडीतर्फे मिन्हेर – 1, विठ्ठलवाडी वडज – 1, शिरोलीतर्फे आळे -2, एकूण- 22, ऍक्टिव्ह- 18.