नवी दिल्ली :- एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा यंदा भारतात होत आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ भारतीय संघाला होणार असला तरीही हा संघ विश्वकरंडक जिंकेल असे वाटत नाही, असे परखड मत भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याने व्यक्त केले आहे.
भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाजांच्या दुखापतींनी सतावले आहे. त्यांच्या दुखापती कधी दूर होतील व त्यांच्याकडून स्पर्धेत कशी कामगिरी होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे.
तसेच प्रमुख फलंदाज व गोलंदाजांच्या कामगिरीतही सातत्य नसल्याने यंदा भारतीय संघासाठी विश्वकरंडक जिंकणे कठीण दिसत आहे, असेही युवराज म्हणाला.