मुंबई – ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी झालेल्या तीन ट्रेनच्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
देशातील सर्वात भीषण रेल्वे अपघातातील हा एक अपघात आहे. सध्या सगळीकडे याच अपघाताची चर्चा सुरु असताना, आता बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं एक विधान चांगलंच चर्चेत आल्याचं दिसून येत आहे.
बालासोरसारख्या दुर्घटनांची आधीच माहिती मिळते का? असं पंडित धीरेंद्र शास्त्री यांना विचारण्यात आले होते. त्यावर धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, ‘काही घटनांचे संकेत मिळतात. माहिती असणे आणि ते टाळणे हे वेगळे असते.
श्रीकृष्ण भगवानला महाभारत होणार हे माहिती होते परंतु ते टाळू शकले नाही’ असं सांगत बागेश्वर बाबाने रेल्वे अपघाताची जी घटना घडली तशी पुन्हा होऊ नये. जखमी लवकरात लवकरत बरे होवो अशी प्रार्थना केली. सध्या त्यांचं हे विधान चर्चेत आलं असून, नेटकऱ्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
अपघात नेमका कशामुळे झाला?
कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी या दोन्ही गाड्या एकाचवेळी एकाच रुळावर आल्याने हा अपघात झाल्याचे समजते. सिग्नल यंत्रणेतील खराबीमुळे दोन्ही गाड्या एकाचवेळी एका रुळावर आल्याचे सांगितले जात आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नई ते पश्चिम बंगालमधील हावडामार्गे ओडिशापर्यंत धावते.