अजित पवारांनी मानले मोदी, शहां’चे आभार
मुंबई: आम्ही राज्याला एक स्थिर सरकार देऊ, जे महाराष्ट्रातील लोकांच्या हितासाठी परिश्रम घेतील.
काल उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतल्यापासून आजपर्यंत कोणतेही स्टेटमेंट न देता अजित पवारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी, सीतारामण, स्मृती इराणी , राजनाथ सिंग, पियुष गोयल, जे पी नड्डा यांना धन्यवाद केले.
राष्ट्रवादीतून बंडखोरी करून भाजपच्या गोटात दाखल झालेल्या अजित पवारांचे बंड शमवण्याचे राष्ट्रवादीसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. अजित पवारांची समजूत काढण्यासाठी राष्ट्वादीचे जेष्ठ नेते त्यांच्या भेटीला गेले होते. परंतु पुन्हा त्यांना खाली हातानेच परतावे लागल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. मात्र त्यांची मनधरणी करण्यात दोन्ही नेते अपयशी ठरले. उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, आता ट्विटरवर अजित पवारांनी सर्वांना धन्यवाद देण्यास सुरवात केली आहे.
Thank you Hon. Prime Minister @narendramodi ji. We will ensure a stable Government that will work hard for the welfare of the people of Maharashtra. https://t.co/3tT2fQKgPi
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) November 24, 2019