नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिला आहे. “लोकशाही मूल्यांचे संरक्षण होणे आवश्यक आहे. लोकांना चांगले सरकार मिळणे हा मुलभूत अधिकार आहे. तसेच न्यायालयाला यासंदर्भात काही आदेश देणे गरजेचे आहे,” असे मत न्यायमूर्ती एन.व्ही रामन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठानं नोंदवले.
Maharashtra government formation: Supreme Court orders open secret ballot; Pro-tem Speaker should be appointed to conduct Floor Test which should be completed before 5 pm tomorrow (Nov 27).
— ANI (@ANI) November 26, 2019
“घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणताही विलंब न करता 27 नोव्हेंबरला पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी पूर्ण करून बहुमत चाचणी घेण्यात यावी. बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून बहुमत चाचणी गुप्त मतदान पद्धतीने न करता त्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात यावे,” असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायायलयाच्या आदेशानंतर भाजपासमोर उद्याच बहुमत सिद्ध करण्याच आव्हान असणार आहे.