पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) आत्तापर्यंत शाळांमध्ये 51 हजार 948 बालकांचे शाळांमध्ये प्रत्यक्ष वेळेत निश्चित करण्यात झाले आहेत. प्रवेशासाठी दि.23 जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
“आरटीई’ प्रवेशासाठी एप्रिलमध्ये ऑनलाइनद्वारे लॉटरी काढण्यात आली होती. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रकही अनेकदा कोलमडले होते. त्यानंतर दि.11 जूनपासून शाळांमध्ये प्रवेश घेण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
राज्यात “आरटीई’ प्रवेशासाठी 9 हजार 423 शाळामध्ये 96 हजार 684 जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. या जागांसाठी 2 लाख 22 हजार 584 प्रवेशासाठी जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. यासाठी 82 हजार 129 बालकांना लॉटरी लागली आहे. यातील 43 हजार 970 बालकांचे शाळांमध्ये तात्पुरते प्रवेश झाले आहेत. लॉटरी लागलेल्या सर्वांचेच अद्यापही प्रवेश झालेले नाहीत.
पुणे जिल्ह्यात 985 शाळांमध्ये 14 हजार 773 जागा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. यासाठी 55 हजार 813 अर्ज दाखल झाले आहेत. यातील 14 हजार 567 बालकांना लॉटरी लागली. त्यातील 8 हजार 96 बालकांचे शाळांमध्ये तात्पुरते तर 9 हजार 37 बालकांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत.
ठाणे जिल्ह्यात 5 हजार 624, रायगडमध्ये 2 हजार 628, नागपूरमध्ये 2 हजार 807, जळगावमध्ये 2 हजार 160, औरंगाबादमध्ये 2 हजार 153, अहमदनगरमध्ये 1 हजात 960, अकोलामध्ये 1 हजार 359, अमरावतीत 1 हजार 235 बुलढाण्यात 1 हजार 310, मुंबईमध्ये 2 हजार 714 याप्रमाणे बालकांचे प्रवेश निश्चित झाले, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.