नवी दिल्ली – करोनाच्या वाढत्या संकटामुळे जगभरातील जवळपास सर्वच देशांनी लाकडाऊनचा पर्याय निवडला आहे. परंतु यात विविध क्षेत्रांना टाळे लावण्यात आले आहे तर काही अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे.
परंतु या दरम्यान वीज मागणी देशासह जगभरात मागील 70 वर्षांच्या कालावधीत प्रथमच प्रभावीत झाली आहे. यात मार्चमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यामुळे देशातील वीजेची मागणी आतापर्यंत 30 टक्क्यांनी घटली आहे.
आंतरराष्ट्रीय एनर्जी एजन्सीच्या (आयइए)माहितीनुसार प्रती आठवडयाला लॉकडाऊन वाढविल्यास वर्षाच्या पातळीवर वीज मागणी 0.6 टक्क्यांनी कमी हेण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अर्थातच त्यामुळे कार्बनचे उत्सर्जनही घटले आहे.
एक महिना लॉकडाऊन वाढविल्याच्या मागणीमुळे जवळपास वीज मागणी 1.5 टक्क्मयांनी कमी होणार आहे तर एजन्सीच्या अंदाजाप्रमाणे 2020 मध्ये वीज मागणी 6 टक्क्मयांनी कमी होणार असल्याचे म्हटले आहे. 2008 मध्ये आलेल्या मंदीच्या संकटापेक्षा ही मागणी 7 पटीने कमी असल्याचे सांगितले आहे.
सध्या उद्योग व्यवसाय ठप्प असल्याने या क्षेत्राची चिंता वाढणे साहजिक आहे. परंतु यावेळी कार्बन उत्सर्जनात गेल्या वर्षाच्या तुलनेत देशातील हे प्रमाण 8 टक्क्यांनी घटण्याचे संकेत या अहवालातून देण्यात आले आहेत.