शिरूर- महात्मा जोतिराव कर्जमाफी योजना 2019 यात शिरूर तालुक्यातील दहा हजार 424 शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 90 कोटींचे जवळपास सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार आहे. आजपर्यंत दहा कोटी रुपयांचे कर्जमाफ झाले आहे, तर लवकरच सर्व शेतकऱ्यांचे दोन लाखापर्यंत कर्जमाफ होणार असल्याचे शिरूर तालुका सहायक निबंधक हर्षित तावरे यांनी सांगितले.
शिरूर तालुक्यातील बॅंकांनी शेतकऱ्यांचे पीक कर्जाची माहिती ती व थकीत कर्जाची माहिती ती महाराष्ट्र शासनाला दिली असून यातून महाराष्ट्र शासनाने 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत खात्याची माहिती घेतली आहे. ही सर्व माहिती शासनाने घेऊन शासनाने दोन लाखांपेक्षा कमी असणाऱ्या थकित शेतकऱ्यांची कर्जमाफी शिरूर तालुक्यात केली असून या कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी शिरूर तालुक्यातील सर्वच गावातील मिळून दहा हजार 424 आहे. या दहा हजार 424 शेतकऱ्यांच्या मिळून 90 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ होणार आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.