Death of farmer। आपल्या विविध मागण्यासाठी पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करत आंदोलन पुकारले आहे. त्यातच आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक पुकारलीय.
दरम्यान, शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी एका 63 वर्षीय शेतकऱ्याचा शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या आंदोलनातील हा पहिला बळी आहे. । Death of farmer
गेल्यावेळी दिल्ली सीमेवर झालेल्या आंदोलनाच्यावेळी सुमारे साडे सातशे शेतकऱ्यांचे बळी गेले असल्याचं सांगण्यात आलं आहे. ग्यान सिंग असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून आज सकाळी छातीत दुखू लागल्याने त्यांना पंजाबमधील राजपुरा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
तेथून त्यांना तातडीने पटियाला येथील राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील असलेले ग्यानसिंग दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चात सहभागी होण्यासाठी शंभू सीमेवर आले होते.
संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) आणि किसान मजदूर मोर्चाने हे आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी मंगळवारी (दि. 13) मोर्चाला सुरुवात केली आणि तेव्हापासून ते पंजाब आणि हरियाणाच्या शंभू आणि खनौरी सीमेवर तळ ठोकून आहेत.
दरम्यान, यंदाचे किसान आंदोलन 2.0 आणि तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आणि किती शेकतरी जखमी झाले, यावर एक नजर टाकणार आहोत.
या आंदोलनादरम्यान 700 हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
एक वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सातशेहून अधिक लोकांचा बळी गेल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला आहे. तसेच या शेतकऱ्यांना हुतात्मा दर्जा देण्याची मागणीही शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
आंदोलनात आतापर्यंत 400 हून अधिक शेतकरी जखमी । Death of farmer
आंदोलनात आतापर्यंत हून अधिक शेतकरी जखमी झाल्याचा दावा शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी केला आहे. आमच्या विरोधात संपूर्ण ताकदीचा वापर केला जात असल्याचे ते म्हणाले. हा मुद्दा आम्ही सरकारकडे मांडला आहे. आमचे सोशल मीडिया हँडल बंद केले जात आहेत.
आम्हाला देशद्रोही म्हटले जात आहे. आमचे 70 YouTube चॅनेल बंद करण्यात आले आहेत. सरकार आमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीला जाण्याच्या आमच्या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. असं देखील ते यावेळी म्हणाले.
सरकार आणि शेतकरी यांच्यात संवाद । Death of farmer
गुरुवारी सायंकाळी उशिरा चंदीगडमध्ये शेतकरी आणि केंद्रीय मंत्री यांच्यात चर्चा झाली. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानही उपस्थित होते. या सकारात्मक चर्चेनंतर रविवारी पुन्हा उभय पक्षांमध्ये चर्चा होणार आहे. बैठकीनंतर शेतकरी नेते सर्वनसिंह पंढेर म्हणाले की, प्रश्नांवर चर्चा करू नका, असे आम्ही सांगितले.
त्यावरही उपाय शोधला पाहिजे. त्यावर केंद्र सरकारने त्यांना वेळ हवा असल्याचे सांगितले. एमएसपीवर दीर्घकाळ चर्चा झाली. त्याच वेळी, हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी 17 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
संबधित बातम्या नक्की वाचा…..
सर्वात पहिलं शेतकरी आंदोलन कधी झालं माहित आहे का? इंग्रजांना घ्यावी लागली माघार, तब्बल 44 वर्षे…..