पुणे(प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमी मध्ये मनुष्य प्राण्याची संपूर्ण जीवन शैली बदलून गेली आहे.प्रत्येक पालकांची आपल्या मुलांची लग्ने थाटामाटात करण्याची अनेक दिवसांची इच्छा असते.परंतु या कोरोनाच्या वैश्विक महामारी मध्ये आपल्या मुलांची लग्न कशी लावायची या प्रश्नाचे उत्तर अनेक कुटुंबाना पडत आहे.
हा प्रश्न पडलेला अनेक जण जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चौकशी करतात. पोलिसही त्यांना सर्वोपतरी मदत करत सोशल डिस्टंसचे नियम पाळून घरगुती पध्दतीने विवाह करण्यास सहकार्य करत आहेत. अशाच एका विवाह प्रसंगी दत्तवाडी पोलिसांनी नवदांम्पत्यास आहेर म्हणून ” करोना सुरक्षा किट’ची भेट दिली.