पुणे – लाच घेतल्याप्रकरणात महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या लिपिकाला विशेष न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. त्या लिपिकाची निर्दोष मुक्तता केली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी याबाबतचा आदेश दिला.
दत्तात्रय ओहळ असे त्या लिपिकाचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ऍड. प्रताप परदेशी आणि ऍड. अभिषेक अवचट यांच्यामार्फत न्यायाल्यात बाजू मांडली. फिर्यादींच्या वडिलांच्या मृत्यूनंतर विद्युत मीटर आईच्या नावावर करण्यासाठी ओहळ याने 1 हजार रुपयांची लाच मागितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली होती.
या प्रकरणात विशेष न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. याविरोधात उच्च न्यायालयात अपील करण्यात आले. ऍड. प्रताप परदेशी आणि ऍड. अभिषेक अवचट यांनी मांडलेले मुद्दे ग्राह्य धरत न्यायालयाने हा निकाल दिला