मुंबई : मुंबई सत्र न्यायालयाने आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना नोटीस बजावली असून त्यांनी जामीनाच्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही तर त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करू नये? असा सवाल करत याविषयी त्यांनी आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याने माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती. यावरून सरकारी वकिलांनी त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे म्हंटले होते. त्याच्याशी संबंधित अर्जाची सत्र न्यायालयाकडून दखल घेण्यात आली असून, “तुमचा जामीन का रद्द करू नये ?” अशी विचारणा करून न्यायालयाने राणा दाम्पत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Maharashtra | Mumbai Police has filed an application in court stating that Ravi-Navneet Rana have violated the bail condition by their statements and their bail is cancelled as per the bail orders. A non-bailable warrant should be issued against the couple, says the police.
— ANI (@ANI) May 9, 2022
मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यास जामीन देताना काही अटी देखील घातल्या होत्या, मात्र जामिनानंतर राणा दाम्पत्यांकडून माध्यमांसमोर विविध विधानं केली गेली. त्यामुळे या अटींचं उल्लंघन झालं असल्याचं सरकारी पक्षाचं म्हणणं आहे. त्यामुळे आता न्यायालयाने राणा दाम्पत्यास नोटीस बजावली आहे.
मुंबई पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे की, रवी आणि नवनीत राणा यांनी त्यांच्या वक्तव्याने जामीन अटीचे उल्लंघन केले असून, जामीन आदेशानुसार त्यांचा जामीन रद्द व्हावा आणि या जोडप्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे न्यायालयाने राणा दाम्पत्यास त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी नोटीस बजावली आहे. आता यावर सुनावणी कधी होईल याबाबत न्यायालयाने माहिती दिलेली नाही.