Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील मद्यधोरण गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने केजरीवाल समन्स बजावले आहे. येत्या १७ फेब्रुवारीला हजर राहण्यास सांगितले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) यापूर्वी केजरीवाल यांना पाच वेळा समन्स बजावला होता. मात्र समन्स बजावून देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. ‘ईडी’ने केजरीवाल यांच्याविरोधात न्यायालयात तक्रार केली होती. त्यावरून अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी दिव्या मल्होत्रा यांनी केजरीवाल यांना समन्स बजावले.
‘तक्राराची दखल घेण्यात आली असून, केजरीवाल यांनी समन्सचे पालन करणे कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे 17 फेब्रुवारीला हजर राहण्यासाठी त्यांना समन्स बजावण्यात येत आहे,’ असे त्यांनी नमूद केले. 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासासंदर्भात पाचव्यांदा ईडीच्या समन्सवर चौकशीसाठी आले नव्हते.
यापूर्वी, त्यांनी 18 जानेवारी, 3 जानेवारी, 2 नोव्हेंबर आणि 22 डिसेंबर रोजी जारी केलेले चार समन्स बेकायदेशीर आणि राजकीय हेतूने फेटाळले होते. निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी मला समन्स बजावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. निवडणुकीत प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी मला समन्स बजावण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. केजरीवाल यांच्याविरुद्ध ईडीने मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा आणि फौजदारी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना १७ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहावं लागणार आहे.