अमरावती : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुक्रवारी संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. लॉकडाऊन करू नये, यासाठी विरोधकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमुळं अमरावती जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने खाली आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे.
अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या राज्यात अव्वल होती. जिल्ह्यात दररोज 950 पर्यंत रुग्ण सापडत होते. मात्र आता ही रुग्णसंख्या 300 च्या आत आली आहे. अमरावती जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात 15 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. त्यामुळं मोठी टीका झाली होती. मात्र लॉकडाऊनला अमरावतीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केल्यामुळे शहरात झालेली भयावह परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. जिल्ह्यात ३० मार्च रोजी तर केवळ १०८ रुग्ण आढळले होते.
गेल्या 5 दिवसांतील परिस्थिती!
27 मार्च – 396, मृत्यू 5
28 मार्च – 348,मृत्यू 3
29 मार्च – 241, मृत्यू 6
30 मार्च – 108, मृत्यू 2
31 मार्च – 259, मृत्यू 6
1 एप्रिल – 288,मृत्यू 3
2 एप्रिल – 275,मृत्यू 4