नवी दिल्ली – केंद्र सरकारने पुन्हा एकदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. हा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
याबाबत कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी माहिती देताना म्हटले की, भातावरील किमान आधारभूत किंमतीमध्ये 72 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानंतर 1868 रुपये प्रतिक्विंटलपासून भात आता प्रतिक्विंटल 1940 रुपये झाला आहे. यासह बाजरीवरील किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2150 रुपयांवरून 2250 रुपये प्रतिक्विंटलवर करण्यात आली आहे.
कृषीमंत्री म्हणाले, गेल्या 7 वर्षात शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकेल यासाठी मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. किमान आधारभूत किंमत 2018 पासून किंमतीवर 50 टक्के परतावा जोडून घोषित केली जाते. चालू खरीप विपणन हंगामासाठी 2020-21 (6 जून 2021 पर्यंत) गेल्या वर्षीच्या 736.36 एलएमटीच्या तुलनेत किमान आधारभूत किंमतीवर एलएमटी पेक्षा जास्त धान्य खरेदी केले गेले, ज्यामुळे शेतकऱ्यांना यांचा फायदा झाला आहे.
देशातील सर्व पक्षांना कृषी कायदा आणायचा होता. परंतु त्यांची हिंमत होऊ शकली नाही. भारत सरकारने 11 वेळा शेतकऱ्यांशी संवाद साधला. परंतु कोणत्याही शेतकरी संघटनेने किंवा कोणत्याही पक्षाने यावर उत्तर दिले नाही. त्यामुळे चर्चा पुढे जाऊ शकली नाही. जेव्हा शेतकरी चर्चेसाठी तयार असतात, तेव्हा आम्ही चर्चेसाठी तयार असतो.
पीक – आधारभूत किंमत वाढ (रुपये)
धान (सामान्य) 1940 72
धान (ग्रेड ए) 1960 72
ज्वारी (हाईब्रिड) 2738 118
ज्वारी (मालदांडी) 2758 118
बाजरी 2250 100
नाचणी 3377 82
मका 1870 20
तूर 6300 300
उडीद 7275 79
भुईमूग 5550 275
सूर्यफूल बियाणे 6015 130
सोयाबीन 3950 70
तीळ 7307 452
कापूस (मध्यम रेशा) 5726 211
कपास (लांब रेशा) 5025 200