मुंबई – करोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. नोकर-कपातीची सर्वाधिक फटका तरुणासह जेष्ठांना सुद्धा बसला आहे. असं असले तरी आता मात्र, हळूहळू परिस्थिती पूर्ववत होऊन अर्थचक्र पुन्हा सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. नोकऱ्या गेलेले अनेक जन आता छोट्या मोठ्या धंद्यात गुंतवणूक करू पाहत आहे.
करोनाच्या काळात अर्थचक्र पुन्हा सुरु झाले असले तरी, अस्थिर बाजारात गुंतवणूक करावी का किंवा गुंतवणूक करायची असल्यास कुठे करावी, असे एक ना अनेक प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात आहेत. गुंतवणुकीबाबत कसा दृष्टीकोन असावा हे जाणून घेऊया.
एकीकडे करोना काळात पहिल्या दुसऱ्या लाटेत देशात लॉकडाउन लागल्यावर जी क्षेत्रे अविरत सुरू होती, ती म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स. दुधाचा व्यवसायाला अत्यावश्यक भाग म्हणत संपूर्ण देशात हा व्यवसाय अखंडपणे सुरूच होता. देशातील डेअरी प्रोडक्ट्समध्ये एक नावाजलेले नाव म्हणजे (Amul)अमूल
येत्या काळात हि प्रसिद्ध कंपनी Amul अमूल व्यवसाय गुंतवणूक दारांना मोठी संधी देत आहे. बिझनेस करण्याच्या विचारात असाल, तर ही सुवर्ण संधी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. अमूल फ्रँचायझीच्या माध्यमातून छोटी गुंतवणूक करून महिन्याला नियमित कमाई करता येऊ शकते, असे सांगितले जाते.
यामध्ये सुमारे २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तसेच नॉन रिफंडेबल ब्रँड सिक्युरिटी म्हणून २५ हजार रुपये, तर रिनोव्हेशन अर्थात नूतनीकरणासाठी एक लाख रुपये आणि साधनसामुग्रीसाठी ७५ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जर तुम्हाला अमूलची फ्रँचायझी हवी असेल retail@amul.coop यावर मेल करावा लागेल. सर्व तपशील डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी अमूलच्या वेबसाईटला भेट द्यावी, असे सांगितले जाते.