Rahul Gandhi – तेलंगणात 30 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस सत्तेवर आल्यास महिलांना 4 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल, असे कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सांगितले. राहुल गांधी (Rahul Gandhi) कालेश्वरम प्रकल्पाच्या मेडिगड्डा (लक्ष्मी) बॅरेजजवळील अंबाथीपल्ली गावात महिलांच्या सभेला संबोधित करत होते.
गांधी म्हणाले की, तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी लुटलेले सर्व पैसे कॉंग्रेसने परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, केसीआर राव यांनी केलेल्या लुटीचा सर्वाधिक फटका तेलंगणातील महिलांना बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी लुटलेली रक्कम तुमच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाने घेतला आहे.
तेलंगणात एक लाख कोटी रुपयांची लूट झाल्याचा आरोप करत राहुल म्हणाले की, बीआरएस, भाजप आणि एमआयएम आगामी निवडणुका एकत्र लढत आहेत. पण खरी लढत कॉंग्रेस आणि केसीआर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष यांच्यात आहे. एमआयएम आणि भाजप बीआरएसला पाठिंबा देत आहेत.
त्यामुळे “डोरला’ (खासगी) सरकार हटवून “परजला’ (लोकांचे) सरकार आणण्यासाठी तुम्हाला कॉंग्रेसला पूर्ण पाठिंबा द्यावा लागेल. राहुल गांधी यांनी केसीआरवर कलेश्वरम प्रकल्पातून पैसे कमावल्याचा आरोप केला.
ते म्हणाले की, हा प्रकल्प केसीआरसाठी एटीएमसारखा आहे. हे एटीएम चालवण्यासाठी तेलंगणातील सर्व कुटुंबांना 2040 पर्यंत वार्षिक 31,500 रुपये खर्च करावे लागतील.
कसा होणार चार हजाराचा लाभ?
1. महिलांना सामाजिक पेन्शन रु. 2500 बॅंक खात्यात
2. एलपीजी सिलिंडर अवघ्या 500 रुपयांत
3. सरकारी बसमध्ये मोफत प्रवास 1000 रु