मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे फडणवीस यांनीच सभागृहात सांगितले. या प्रकरणात एका मुलीला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे, त्याची चौकशी करून जे सत्य असेल ते उघड झाले पाहिजे. परंतु राज्याचे गृहमंत्रीच सुरक्षित नसेल तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल?, असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.
नाना पटोले म्हणाले, सभागृहात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना गोवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले. त्यांना एक कोटी रुपयाची लाच ऑफर केल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीसांचे त्या संबंधित परिवाराशी ते मुख्यमंत्री असतानापासूनचे जुने संबंध आहेत.
मी फक्त सभागृहापुरतीच उपसभापती का?; नीलम गोऱ्हेंनी विधानपरिषदेत व्यक्त केली नाराजी
सत्तेत असताना आणि सत्तेत नसतानाही फडणवीस यांच्या कुटुंबाचा आणि ज्यांच्यावर ब्लॅकमेल केलेल्या आरोप केला आहे, त्या कुटुंबाचा संबंध आहेत. यामागे काही राजकीय नेते आणि पोलीस अधिकारीही असल्याचा त्यांचा आरोप आहे. अशात फडणवीस हे गृहमंत्री आहेत, पोलीस यंत्रणा त्यांच्याकडे आहे, त्यांनी या प्रकरणाची चौकशी करावी व वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, असे आवाहन त्यांनी केले.