मुंबई – नाना पटोलेंनी कितीही नौटंकी केली तरी काही उपयोग होणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट कॉंग्रेसनेच देशाची मागी मागितली पाहिजे, असे प्रत्युत्तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
फडणवीस म्हणाले, कोणाची हिंमत नाही ते इथे येऊन निदर्शनं करतील. मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. माफी मागायची असेल तर ती कॉंग्रेसने या देशाचे वाट्टोळं केल्याबद्दल मागावी.
त्यामुळे हे नाना पटोले वैगैरे नौटंकीबाज आहेत. यांनी कितीही नौटंकी केली तरी काही परिणाम होत नाही, असा टोला त्यांनी लगाविला.