नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे नेते आणि खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी तमिळनाडूतील राम सेतु राष्ट्रीय स्मारक घोषित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच राम सेतुचा जीर्णोद्धार करण्याची आपली इच्छा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
“राम सेतु” ही तमिळनाडूच्या दक्षिण पूर्व किनारवर्ती भागातील “पंबन” आणि “मनार” दरम्यानची दगडापासून बनवलेली श्रृंखला आहे. त्याचा जीर्णोद्धार केला जावा, अशी मागणी बऱ्याच काळापासून स्वामी करत आहेत. केंद्र सरकार जहाजांच्या येण्या-जाण्यासाठी सुविधा व्हावी यासाठी या भागात “सेतुसमुद्रम” प्रकल्प राबवत आहे. मात्र, स्वामी यांनी त्याला आव्हान दिले आहे.
ते म्हणाले की, एक विदेशी जोडपे माझ्याकडे आले होते. त्यांनी ताज महालला भेट दिली होती. तेव्हा तुम्ही राम सेतुला का गेला नाहीत अगोदर असे आपण त्यांना विचारले. कारण राम सेतुची लव्ह स्टोरी ही ताज महालपेक्षाही जुनी आहे, असा त्यांचा दावा आहे. मात्र, ही लव्ह स्टोरी काय आहे ते त्यांनी उघड केलेले नाही.
अध्यक्षांचा अनादर; कॉंग्रेसचे चार खासदार लोकसभेतून निलंबित
केंद्राच्या सेतुसमुद्रम शिप चॅनल परियोजनेला त्यांचा विरोध आहे. राम सेतुचे रक्षण केले जावे, अशी मागणी त्यांनी केली असून त्याकरता न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली आहे. त्यावर जहाजांच्या चांगल्या येण्याजाण्यासाठी हा प्रकल्प आहे. त्यामुळे राम सेतुला कोणताही धोका पोहोचणार नाही. सरकार त्यासाठी वेगळा पर्याय स्वीकारेल, असे सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे.
स्वस्तात परदेशात फिरायचंय? मग ‘या’ देशांचा नक्की विचार करा !