पुणे – “समर्थ भारत अभियान’ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट, समर्थ रामदास स्वामी संस्थान आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने “मनाचे श्लोक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, 20 ऑक्टोबरपर्यंत याची नाव नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे हे तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी पाच हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. ही स्पर्धा पुणे जिल्हा स्तरावर घेतली जाते. बालवाडी ते दहावी आणि पालकांसाठी खुला गट अशी स्पर्धा होते.
मनाचे श्लोक घरा,घरापर्यंत पोहोचावेत आणि नवी पिढी घडण्याला मदत व्हावी, मनोधैर्य वाढावे, मुलांचे पाठांतर, स्मरणशक्ती वाढावे, शारीरिक बल वाढवणे हा या मागचा उद्देश्य असल्याचे आयोजकांचे म्हणणे आहे.
या स्पर्धा येत्या डिसेंबर महिन्यात होणार आहेत. अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण जानेवारीत होईल. या स्पर्धेसाठी 20 ऑक्टोबरपर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी 9822061290, 8975180667 व 9960469693 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.