नवी दिल्ली – देशांतर्गत क्रीडा स्पर्धांना पुढील वर्षापासून प्रारंभ होणे शक्य असल्याचे मत केंद्रिय क्रीडा मंत्री किरण रिजीजू यांनी व्यक्त केले आहे.
मार्च महिन्यापासून करोनाचा धोका वाढल्यानंतर सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर सर्व परिस्थितीचा आढाव घेतला जात होता. आता धोका काही राज्यांमध्ये कमी झाल्याचे पाहायला मिळत असल्याने काही स्पर्धांचे आयोजन करणे शक्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
गेल्या आठवड्यापासून ऑलिम्पिक पात्र खेळाडूंच्या सरावाला प्रारंभ झाला होता. त्यामुळे आता स्पर्धाही लवकरच सुरु होतील असेही त्यांनी सांगितले. देशातील करोनाबाधितांची संख्या गेल्या आठवड्यापासून काही ठिकाणी वाढली असली तरीही अन्य राज्यांतील काही शहरांमध्ये करोनाचे सर्व नियम पाळून स्पर्धा खळवणे शक्य आहे.