नवी दिल्ली – बहुचर्चित टाटा- एअर इंडिया व्यवहाराला स्पर्धा आयोगाने मंजुरी दिली आहे. दोन महिन्यापूर्वी टाटा समूहाने सरकारच्या अखत्यारीतील एअर इंडिया कंपनी 18 हजार कोटी रुपयांना विकत घेतली आहे.
त्या संदर्भातील तांत्रिक बाबी पूर्ण होत आले असून जानेवारी महिन्यापासून टाटा समूह एअर इंडिया संचलित करणार आहे. एका विशिष्ट रकमेवरील व्यवहाराला स्पर्धा आयोगाची मान्यता लागते. या व्यवहारापूर्वी हेअर इंडियाला रोज 600 कोटी रुपयांचा तोटा होत होता.
या व्यवहारामुळे एअर इंडियाबरोबरच टाटा समूहाचाही लाभ होणार असल्याचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सांगितले आहे. एअर इंडिया कंपनी वर सध्या 61,562 कोटी रुपयांचे कर्ज असून यापैकी टाटा समूह 15,301 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करणार आहे.