नवी दिल्ली, दि. 13 – येथील जामीया मिलीया इस्लामिया संस्थेत आज सरकारी अधिकारी आणि काश्मीर विद्यार्थ्यांसाठी संवाद आणि भोजनाचा कार्यक्रम आयोंजित केला होंता. पण काश्मीर विद्यार्थ्यांच्या संघटनांनी त्यावर बहिष्काराची घोषणा केल्यानंतर सरकारने हा कार्यक्रम रद्द केला.
काश्मीरातील जे विद्यार्थी काश्मीरच्या बाहेर शिकत आहेत पण ज्यांना ईद निमीत्त आपल्या गावी जाता आलेले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ईदच्या मेजवानीचा कार्यक्रम आयोजित करण्याची सुचना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी अशा प्रकारच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी एक लाख रूपयांची मदतहीं देऊ केली होती. त्यानुसारच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
जम्मू काश्मीरच्या माहिती विभागाचे उपसंचालक हे दिल्लीतील जामीया मिलिया विद्यापीठाच्या कार्यक्रमाचे आयोजक होते. तथापी काश्मीरी विद्यार्थ्यांच्या संघटनेने हे निमंत्रण साफ धुडकाऊन लावले. केवळ या भोजनालाच नव्हे तर अन्य कोणत्याही सरकारी संवाद कार्यक्रमावर आमचा बहिष्कार राहील असे त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.