नवी दिल्ली – देशातील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असतानाच एक दिलासादायक बातमी हाती आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्र सरकारतर्फे देशातील कोरोनाग्रस्तांबाबत अद्यावत माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून यातील आकडेवारी दिलासा देणारी आहे. या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये ३५,१७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनामुक्तांचा टक्का वधारला सरकारतर्फे देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर पोहचले आहे. आतापर्यंत देशातील ९,५२,७४६ कोरोना रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण भारतामध्ये कमी असून सध्या मृत्यूचे प्रमाण २.२५ टक्के इतके असल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे.
India’s Case Fatality Rate is currently 2.25%. The Recovery Rate is more than 64% as on today. With 35,176 patients discharged in the last 24 hours, the total recoveries stand at 9,52,743: Government of India#COVID19 pic.twitter.com/HLG8bswIeG
— ANI (@ANI) July 28, 2020