नवी दिल्ली – करोनाच्या नवीन विषाणुविषयी जगभर धास्ती वर्तवली जात असली तरी भारतातील करोना स्थिती मात्र कमालीची नियंत्रणात येत चालली आहे.
गेल्या 24 तासांत संपुर्ण देशात केवळ 8309 नवीन करोना रूग्ण आढळले असून सक्रिय बाधितांची संख्या आता आणखी घटून ती 1 लाख 3 हजार 859 वर आली आहे. हे प्रमाण एकूण बाधित रूग्णांच्या तुलनेत 0.30 टक्के इतके आहे.
दरम्यान गेल्या 24 तासांत करोनामुळे 236 रूग्णांचा मृत्यू झाल्याने करोनामुळे देशात मरण पावलेल्यांची संख्या आता एकूण 4 लाख 68 हजार 790 इतकी झाली आहे. देशातील करोना रूग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट आता 1.09 टक्के इतका झाला आहे. गेले सतत 56 दिवस देशातील पॉझिटीव्हीटी रेट 2 टक्क्यांच्या खाली राहिला आहे.