कोलकाता – दिवाळीच्या सुमारास भारतामध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र याबाबत वेळीच आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्यामुळे वीज निर्मिती वर कोळशाच्या तुटवड्याचा परिणाम झाला नाही. मार्च महिन्यापर्यंत ही परिस्थिती सुरळीत राहील, असे कोल इंडिया या भारतातील सर्वात मोठ्या
कोळसा खाणीच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.
मार्च महिन्यापर्यंत कमीत कमी 70 दशलक्ष टन कोळसा चा राखीव साठा निर्माण करण्यासाठी कॉलीडिया प्रयत्न करीत असल्याचे या कंपनीचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सांगितले गाल चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या संस्थेने आयोजित केलेल्या या विषयावरील परिसंवादात बोलताना अगरवाल म्हणाले की सध्या भारतात 32 दशलक्ष टन कोळशाचा अतिरिक्त साठा आहे.
त्यामध्ये पुढील तीन महिन्यांमध्ये 40 अशा लक्ष टनाची भर घालण्यात येणार आहे. ते म्हणाले की, दिवाळीच्या सुमारास जागतिक कोळसा वाहतुकीवर परिणाम झाला होता. त्याचबरोबर देशभरात अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे खाण्याच्या कामावर परिणाम झाला होता. खाणींमध्ये तयार असलेला कोळसा पुरवण्यात ही वाद वाहतुकीतील अडथळ्यामुळे प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे त्यावेळ काही प्रश्न निर्माण झाले होते. अशा परिस्थितीतही भारतातील कोळसा खाणे उत्तम कामगिरी करून देशांमध्ये विजेची टंचाई निर्माण होऊ दिली नाही.
यामध्ये विजेची मागणी वाढणार असल्यामुळे अतिरिक्त कोनसा पुरवण्याची तयारी ठेवली असल्याचे ते म्हणाले. दरम्यानच्या काळामध्ये सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जेला चालना देण्यात येत आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये वीज कारखान्याकडून कोळशाची मागणी कमी प्रमाणात होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दुर्गपल यामध्ये आपल्याला पर्यायी ऊर्जा स्तोत्र वर भर द्यावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.