ठाणे – शिवसेनेच्या कल्याण येथील तीन माजी नगरसेवकांना बेकायदा बांधकाम पाडण्याच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपासून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्या खेरीज प्रत्येकाला 50 हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे.
सन 2006 साली डोंबिवली एमआयडीसी परिसरातील बेकायदेशीर स्टॉलवर महापालिकेने कारवाई केली त्यावेळी या तीन तत्कालीन नगरसेवकांनी त्यात अडथळे आणून कारवाईला विरोध केला होता. सदानंद थरवळ, तात्यासाहेब माने आणि शरद गंभीरराव अशी त्यांची नावे आहेत.
त्यावेळीच या तीन जणांच्या विरोधात उपलब्ध नियमावलीनुसार महापालिकेने पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार हे खटले दाखल करण्यात आले होते. महापालिकेच्या बेकायदा बांधकाम विरोधी कारवाईत अडथळे आणण्याऱ्या नगरसेवकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांचे पद रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे.