नमस्कार आम्ही आदर्श ग्रुप, पुणे. गेल्या काही वर्षात शहराची कचरा समस्या गंभीर बनली आहे. वेगाने वाढते नागरिकरण, वाढती लोकसंख्या यामुळे शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले आहे. त्यामुळे महापालिकेडून शहरात निर्माण होणारा कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध तंत्रज्ञानावर आधारीत प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पांच्या माध्यमातून शहरात महापालिकेकडून संकलित केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर पालिकेने उभारलेल्या वेगवेगळया प्रकल्पांमध्ये प्रक्रीया केली जाते. या प्रकल्पांच्या माध्यमातून या कंपन्याही शहराची कचरा समस्या सोडविण्यासाठी आपला हातभार लावतात. त्यातीलच एक नाव म्हणजे आदर्श ग्रुप हे आहे. या कंपनीने गेल्या तीन वर्षांपासून हडपसर मधील रामटेकडी येथील औद्योगिक वसाहती मध्ये मिश्र कचऱ्यावर प्रक्रीया करणारा प्रकल्प उभारला आहे. “स्वच्छ भारत… समर्थ भारत… आदर्श भारत…’ हा उद्देश ठेऊन “आदर्श ग्रुप’ने कचरा निर्मूलनाचा एक आदर्श घालून दिला आहे.
पर्यावरणास हानी पोहोचवणारी जागतिक पातळीवरची एक महत्त्वाची समस्या म्हणून नागरी वस्तीतील घनकचरा व्यवस्थापन अर्थात “म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनजेमेंट’ ही आहे. ओला कचरा, सुका कचरा असे केवळ वर्गिकरण करुन ही समस्या मिटणारी नाही; तर कचरा निर्मिती होण्याच्या ठिकाणीच, अर्थात घरे, कार्यालये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये कचरा त्याच्या गटवारीनुसार वेगळाच साठवला पाहिजे; त्याची वाहतूक आणि असा कचरा गोळा करण्याची यंत्रणाही स्वतंत्र असली पाहिजे, तरच कचरा प्रक्रिया केंद्रांचे काम सुलभ होणार आहे. शहरी भागांमध्ये असे कचरा वर्गिकरणाचे प्रयोग अनेक ठिकाणी यशस्वी झाले असून लहान शहरे आण्इ खेड्यापाड्यांत त्याबाबत अजून म्हणावी तशी जनजागृती दिसून येत नाही. या सगळ्या सम्स्यांचा विचार करुनच “आदर्श ग्रुप’ काम करीत आहे.
वर्ष 2016 पासून आम्ही “आदर्श ग्रुप’ या कंपनीच्या मध्यमातून शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी आमच्या कंपनीच्या माध्यमातून पुणे महापालिकेसमवेत कार्यरत आहोत. शहरातील कचऱ्याचे विलीनीकरण करणे आणि त्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रकल्प कंपनीकडून कार्यरत आहे. या माध्यमातून शहराच्या पर्यावरणासाठी हातभार लावतानाच, कचरा मुक्त व दुर्गंधीमुक्त पुण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असून त्या अनुषंगानेच कचरा प्रक्रिया प्रकल्प चालविला जात आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून कंपनीकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रामटेकडी येथील प्रकल्पात टाकावू कचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल (आरडीएफ) सह शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले खत तयार करण्यात येते. तसेच अशा प्रकारचे आणखी दोन प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून लवकरच सुरू केले जाणार आहेत.
दरम्यान, या कचऱ्यावर प्रक्रिया करताना, प्रकल्पात तयार होणारे टाकाऊ कचरा इनर्ट) पर्यावरणास घातक ठरण्याची शक्यता असल्याने कंपनीकडून या कचऱ्यावरही पर्यावरणीय नियमांनुसार, शास्त्रोक्त पध्दतीने भू-भराव (कॅपिंग) करून विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे एका बाजूला शहराची कचरा समस्या सोडविण्यास हातभार लावतानाच दुसऱ्या बाजूला शहराच्या पर्यावरणासाठीही कंपनीकडून हातभार लावला जात असल्याचा आम्हाला विशेष आनंद आहे.
स्वच्छ भारत आदर्श भारत या भूमिकेतून आम्ही स्वच्छ पुण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कचरा ही न सुटणारी समस्या वाटत असली तरी, त्याचे नियमित वर्गीकरण, रिसायकल तसेच रियूज झाल्यास ही समस्या सुटण्यास मदत होणार आहे. महापालिकेकडून त्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना, “आदर्श ग्रुप’ही आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून या समस्येच्या निराकरणासाठी हातभार लावत असल्याचा मला विशेष आनंद आहे. सध्या महापालिकेच्या माध्यमातून एक प्रकल्प सुरू असून, लवकरच आणखी दोन प्रकल्प उभारले जाणार आहेत. त्या माध्यमातूनही शहर कचरामुक्त करण्यासाठी आमची भूमिका सकारात्मक आहे. त्या सोबतच, पुणेकरांचीही साथ मिळत असून भविष्यात “स्वच्छ पुणे… सुंदर पुणे…’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यास मदत होणार आहे.
“स्वच्छ भारत-आदर्श भारत’ या शब्दातच आमची भूमिका स्पष्ट आहे. पुणे शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी आम्ही बांधिल आहोत. त्या भावनेतूनच आदर्श ग्रुपकडून शहरातील कचरा समस्या सोडविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भविष्यात ही समस्या संपविण्यासाठी महापालिकेच्या सोबतीने आम्ही प्रयत्नशिल राहू.
श्री. मिलिंद हरिश्चंद्र पवार
संचालक, आदर्श ग्रुप
भान सामाजिक बांधिलकीचे
“आदर्श ग्रुप’च्या प्रकल्प व्यवस्थापनाकडून केवळ प्रक्रिया प्रकल्प न उभारता, शहरासाठी आपली सामाजिक बांधिलकीही जपली जात आहे. या प्रकल्पास शहरातील खासगी तसेच महापालिकेच्या शाळांकडून नियमित भेटी दिल्या जातात. या वेळी प्रकल्पाच्या माहितीसाठी मुलांमध्ये कचरा निर्मिती, त्यापासून होणारी हानी तसेच कचरा समस्या टाळयासाठी आपली भूमिका काय असावी, याचे प्रशिक्षण प्रकल्प व्यवस्थापनाकडून दिले जाते. त्यामुळे शालेय जीवनातच मुलांना कचरा साक्षर केल्याने भविष्यात त्याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास मदत होणार आहे.
“रिसायकल आणि रियूज’चा प्रभावी वापर
कचऱ्यावर प्रक्रिया करणे हा कचरा निर्मूलनाचा एकमेव पर्याय नाही. ही कचरा समस्या सोडविण्यासाठी “रिसायकल आणि रियुज’ हे दोन घटकही तेवढेच महत्वाचे असल्याचे “आदर्श ग्रुप’ला वाटते. त्यामुळे प्रकल्पात प्रक्रिया करण्यासाठी येणारा कचरा स्वतंत्ररित्या वर्गीकरणकरून त्यातून, कागद, प्लॅस्टिक, काचेच्या बाटल्या, कपडे, पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तू वेगळया केल्या जातात. त्यातून इतर अनेक उद्योगांसाठी कच्चा माल पुरविण्यासही “आदर्श ग्रुप’ने हातभार लावला आहे. त्यामुळे प्लॅटिक पाईप बनविणाऱ्या कंपन्या, काच कंपन्या, कागद कंपन्यांना आवश्यक असलेला कच्चा माल या प्रकल्पातून उपलब्ध होतो. तसेच वर्गीकरण योग्य पध्दतीने झाल्याने, उर्वरीत कचऱ्यावर चांगल्या दर्जाची प्रक्रिया करून औद्योगिक कंपन्यांना ज्वलन प्रक्रियेसाठी आवश्यक असे “आरडीएफ’ कंपनीकडून उपलब्ध करून दिले जाते. या सर्व प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या “इनर्ट गॅस’चे प्रमाणही कमी असल्याने पर्यावरणासही हानी होत नाही.