बॅंकांना असे कोणतेही आदेश नाही
गुवाहाटी – देशातील एटीएममधून 2 हजार रुपयांच्या नोटा कमी होत असलेल्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महत्तवपूर्ण खुलासा केला आहे. 2 हजार रूपयांचे सर्क्युलेशन रोखण्याचे आदेश सरकारने बॅंकांना दिले नसल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे.
गुवाहाटीमध्ये आयोजित एका बैठकीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. एका विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या, माझ्या माहितीप्रमाणे बॅंकांना असे कोणतेही आदेश देण्यात आले नाही. देशातील नोटांचे योग्य पद्धतीने सर्क्युलेशन सुरू आहे. याबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून आढावा घेतला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.
एका अहवालात देशातील 2 लाख 40 हजार एटीएममधून 2 हजार रूपयांच्या नोटा परत मागवण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी इंडियन बॅंकेने देशभरातील आपल्या 3 हजार एटीएममधून 2 हजार रुपयांच्या नोटा परत मागवण्याचा निर्णय घेतला होता. ग्राहक केवळ 2 हजार रुपयांचे सुटे करून घेण्यासाठी बॅंकांमध्ये येत असतात. त्यामुळे बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, असे बॅंकेककडून सांगण्यात आले होते.