नागपूर : वचनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिले पाऊल टाकले. त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट दोन लाखापर्यंत कर्ज माफी करण्याची घोषणा विधानसभा अधिवृषणाच्या शेवटच्या दिवशी केली. मात्र सात बारा कोरा करणार होता त्याचे काय झाले असे विचारत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभात्याग केला.
राज्यात महाआघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्याना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मोठी घोषणा केली. त्यांनी विधानसभेत आज राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याची 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली.
कर्जमाफीसाठी कोणत्याही अटी नसल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सभागृहात दिली. मात्र, विरोधी पक्षाने गदारोळ करत सभात्याग केला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘ज्या शेतकऱ्याचे ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचं संपूर्ण कर्ज करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आज आम्ही शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करत आहोत. कोणालाही फॉर्म भरायची, रांगेत पत्नीसोबत उभे राहण्याची गरज नाही. थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हे सरकार पैसे जमा करणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाबद्दल आम्ही हि भूमिका घेतली आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) December 21, 2019
मुख्यमंत्री ठाकरे यांनी ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली. ही योजना मार्चपासून लागू करण्यात येईल . या योजनेमुळे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील.