मुंबई – पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्याने मोठा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाचे अधिवेशन चालवू न देण्याच्या इशारा दिला आहे. यावर संजय राऊत यांनी उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे न्यायप्रिय आहेत, सत्यवादी आहेत, ते संजय राठोड प्रकरणात न्याय करणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.
संजय राऊत म्हणाले कि, अधिवेशन व्हायला पाहिजे असे आम्हाला वाटते. यामधून शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, कोविड संदर्भात, विरोधकांना जे प्रश्न उपस्थित करायचे आहेत, तेही करू शकतात. पण अधिवेश होऊ द्या, गोंधळ नको. पण अधिवेशन होऊच द्यायचं नाही. हे लोकशाही विरोधी आहे,
यावेळी पूजा चव्हाण प्रकरणात सुरू असलेल्या भाजपच्या आंदोलनाबाबत संजय राऊत म्हणाले, पंतप्रधानांनी सांगितलं की आंदोलन करायचे नाही. मात्र महाराष्ट्रापर्यंत हा संदेश पोहोचलेला दिसत नाही. विरोधी पक्षाला आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहेत. पण प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत, असेही त्यांनी म्हंटले आहे.