Sanjay raut : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरु असणाऱ्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागले. ठिकठिकणी तोडफोड करत जाळपोळीच्या घटना घडल्या. तर मनोज जरांगे पाटील यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आणि हिंसाचार करू नये, असे आवाहन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आंदोलनाला गालबोट लागेल असे वर्तन करू नये, असे आवाहन केले होते. दरम्यान, याच मुद्यांवरून आज सर्वपक्षीय बैठक होत आहे,आज आम्ही बैठकीला राज्यातील सर्व नेते उपस्थित असणार आहे. यावरून आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठकीला ऐरेगैरे नथुलाल लोकांना बोलावल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’जर महाराष्ट्राचं नुकसान होत असेल, महाराष्ट्र एखाद्या विषयावर पेटवला जात असेल तर सर्व पक्षांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा. पण दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ऐरेगैर नथुलाल बोलवले आहेत. ज्यांचा एकही आमदार नाही. ज्यांच्या पक्षाचं अस्तित्वच नाही. एखादा आमदार आहे. ज्या संघटनेला पाठबळच नाही अशा सगळ्यांना आमंत्रित केलं’
राऊत पुढे म्हणाले,’जरांगे पाटलांनी सांगितलंय की राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे. खरंतर एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे”, अस म्हणत राज्य सरकारवर राऊत बोचरी टीका केली.